चवदार तळे सत्याग्रह
चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त ऑनलाईन उपलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
Vasantrao Naik Mahavidyalaya,Chhatrapati Sambhaji Nagar (M.S.)
चवदार तळे सत्याग्रह
चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त ऑनलाईन उपलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
संत गाडगे महाराज
गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
ग्रंथ/ Books:
१. संत गाडगे महाराज काल आणि कर्तृत्च
२.श्री संत गाडगेबाबा - Satyashodhak
3 गाडगे बाबा - लोकसेवा के कर्मयोगी (सचित्र) - हिंदी - प्रेरक जीवनी
लेख/Articles:
1समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे महाराज
3 संत गाडगे महाराज यांचे वऱ्हाडी भाषेतील किर्तन
4 माणसात देव पाहिलेले संत गाडगे महाराज - Mumbai Tarun Bharat
युट्यूब व्हिडिओ /Youtube Video:
2 गाडगे महाराज (Gadge Maharaj) कीर्तन 1956 |
4 राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या आवाजातील शेवटचे कीर्तन,गाडगे ...
5 Devki Nandan Gopala - Marathi Film
संशोधन /Research:
1 संत गाडगेबाबांची सामाजिक विचार :एक समाजशास्त्रीय अभ्यास
2 संत गाडगे महाराजांची जीवन आणि समाज प्रबोधन
3 संत गाडगे महाराजांचे शिक्षण विषयक विचार व कार्य एक चिकित्सक अभ्यास
इतर/other Sources:
1 गाडगे महाराज (Gadge Maharaj) - मराठी विश्वकोश
4 गाडगेबाबा : प्रबोधनाचे विचारपीठ
5 समाजसुधारक: संत गाडगे महाराज
6 गाडगे महाराज - History of India
Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources).
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
जन्मनाव: केशव गंगाधर टिळक;
(जुलै २३, १८५६ - ऑगस्ट १, १९२०)
बाळ गंगाधर टिळक (जन्मनाव: केशव गंगाधर टिळक; जुलै २३, १८५६ - ऑगस्ट १, १९२०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी एक होते.
टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हणले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला" असा होतो.महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हणले.

टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात
"मराठी भाषा गौरव दिन"
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले, ज्यात 'विवेकसिंधू' (शा.श.१११०) हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते.
कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे कुशल लेखन केले. विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत.
Books/पुस्तकं :
1. मराठी भाषा वक्प्रचार म्हणी इत्यादी : शंकर नरहर जोशी
2. भाषा संचालनालयाचे परिभाषा कोश
Articles :
Other Online Resources /
1.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची प्रकाशने
4. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४
5. मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था ई- पुस्तके
Youtube Videos/
2. का साजरा होतो मराठी भाषा दिन | मराठी भाषेचा इतिहास
Research:
1. युरोपीयांचा मराठी भाषा वाङ्मयाचा अभ्यास व सेवा
4 उत्तर आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी कादंबरी
5.मराठी बुद्धी एकांकिका चा चिकीत्सक अभ्यास
Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources).
केशव सीताराम ठाकरे
उर्फ
प्रबोधनकार ठाकरे
(17 सप्टेंबर 1885 – 20 नोव्हेंबर1973)
प्रबोधनकार ठाकरे (केशव सीताराम ठाकरे) हे एक प्रसिद्ध समाजसुधारक, पत्रकार, लेखक आणि राजकारणी होते, ज्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला.प्रबोधनकारांनी महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी, आगरकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव स्वीकारला. त्यांनी सत्यशोधक समाजाची तळपती तलवातळपती तलवार म्हणून सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, हुंडा विरोधी ,बालविवाह, विधवा केशवपन,हुंडा प्रथा, ब्राह्मणेतर चळवळीत सक्रिय सहभाग आणि त्यांच्या लिखाणातून तसेच भाषणातून सामाजिक सुधारणांवर जोर दिला आणि देवळांमधील पुरोहितशाही यांच्याविरुद्ध लढा दिला. त्यांच्या लेखन आणि वक्तृत्वातून त्यांनी रूढी-परंपरांचा तीव्र निषेध केला.
प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख नेते होते. त्यांनी मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलने, लेखन आणि वक्तृत्वातून योगदान दिले. त्यांचे मत होते की, धर्माने माणसाला माणुसकीने वागण्याची सवलत द्यावी; अन्यथा तो धर्म माणसांनी का जुमानावा.
महर्षी वाल्मिकी जयंती
Birth Anniversary of Maharshi Walmiki
"महर्षि वाल्मिकी" यांना "रामायण" महाकाव्याचे पारंपारिक लेखक म्हणून ओळखले जाते.महर्षी वाल्मिकी यांना आद्य कवी असेही म्हटले जाते. ते संस्कृत मधील आणि जगातील पहिल्या श्लोकाचे रचयिता मानले जातात. महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाची रचना केली ज्यात ७ कांड आणि २४००० श्लोक आहेत…. अनुष्टुभ छंद या शास्त्रीय संस्कृत छंदात रामायणाची रचना केली गेली आहे. वाल्मिकी जयंती पवित्र धर्मग्रंथ रामायण लिहिणारे प्रसिद्ध ऋषी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती स्मरणार्थ साजरी केली जाते.वाल्मिकी श्रीरामाचे खूप मोठे भक्त होते. वाल्मिकी जयंती हा प्रगत दिवस म्हणूनही साजरा केला जातो. हिंदु धर्मात वाल्मिकी जयंतीचे खूप महत्त्व आहे. या वर्षी वाल्मिकी जयंती आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. दरम्यान, वाल्मिकी जयंतीचे पौराणिक महत्त्व जाणून घेऊयात.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
Books/पुस्तकं :
1) वाल्मीकिरामायंकोश राजकुमार राय2) Srimad Valmiki Ramayana by T.r.krishnacharya
3) मद्वाल्मिकी रामायण by महर्षि वाल्मिकी
4) Sankshipta Valmikiramayanam (second Edition) by Ramchandra Govind &son, Kalvadevi Road Mumbai
5) Sankshipta Valmikiramayanam (second Edition) by Ramchandra Govind &son, Kalvadevi Road Mumbai
6) श्री संत तुलसीदास कृतरामायण बालकांड
Other Online Resource
1) Maharishi Valmiki Jayanti 2023
2) Valmiki Jayanti 2023 : कोण होते महर्षी वाल्मिकी, सम्पूर्ण माहिती जाणून घ्या
Youtube Videos
1) Tulsi Ramayana | Shri Ramcharitmanas | Sundarkand
2) Ramanand Sagar's Ramayan with English Subtitles - All Episodes
Ph.D.Thesis
1) Valmiki Ramayan ka samalochnatmak adhyayan
2) A critical analysis of valmiki ramayana and its implications to educational leadership
3) The study of values inherent from the ramayana written by maharshi valmiki
4) The contribution of subsidiary characters in the Valmiki Ramayana
Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources).